लोकसत्ता टीम

नागपूर : एका मित्राच्या घरी दारू पार्टी सुरु असताना एकाने “तुझ्या बहिणीशी माझे प्रेमप्रकरण सुरु असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले आहेत” असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या तीन तिघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरीतील पांढराबोडी परिसरत उघडकीस आली.

सागर नकुल नागरे उर्फ (२७, सुदाम नगरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. आरोपी वीर विनोद थापा (१८, सुदामनगर) , अजित संतन नेताम (२६, सूदामनगर) आणि सुरेश मनोहर यादव (२५, अंबाझरी) अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-नागपुरात चिकनगुनियाचा उच्चांक, नागरिक त्रस्त; महापालिका म्हणते…

सागर नागले आणि आरोपी वीर, अजित आणि सुरेश हे सोमवारी रात्री १०:३० वाजता बंटी उइके या मित्राच्या घरात दारू पार्टी करीत बसले होते. पार्टी रंगात आल्यानंतर सागर नागले याने वीर थापाशी हुज्जत घातली. “तुझ्या मामे बहिणीशी माझे गेल्या एका वर्षापासून प्रेम संबंध आहेत, आही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते. तुझ्या बहिणीचे माझ्यावर प्रेम असून आम्ही लवकरच पळून जाऊन लग्न करणार आहोत” असे म्हणाला.

त्यामुळे वीर याला राग आला. त्याने सागरला समजावण्याचा प्रयत्न केल. मात्र तो समजत नव्हता. त्यामुळे रागाच्या भारत वीर आणि त्याच्या दोनही मित्रांनी सागरला मारहाण केली. त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. पण तो मानायला तयार नव्हता. त्यामुळे तिघांनीही सागरच्या डोक्यात दगड, गट्टू घालून खून केला. सागरला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपी पळून गेले. आरडाओरडा ऐकून शेजारी झोपेतून उठले. त्यांनी घरात जाऊन बघितले तर सागर हा मृतावस्थेत पडून दिसला. नागरिकांनी अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्‍या जिल्‍हा प्रमुखावर गोळीबार; कारची काच फुटली….

आरोपींना दोन तासात अटक

वीर, अजित आणि सुरेश हे तिघेही अंबाझरी तलावावर पळून गेले. तेथे त्यांनी पुन्हा दारू ढोसली. पोलिसांनी आरोपींचे लोकेशन काढून तिघांनाही अटक केली. आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे.