नागपूर : भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू असलेला नागपुरातील ऐतिहासिक ‘झीरो माईल’ चे सौंदर्यीकरण आणि विकास करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या अधीन असलेली ही जागा नागपूर महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांनी गुरुवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना ऐतिहासिक झीरो माईलचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे सीएसआर निधी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने गुरुवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये हेरिटेज संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली.

हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेतील या बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, मुख्य अभियंता आणि समितीच्या सदस्य सचिव लीना उपाध्ये, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक अतुल गुप्ता व उपमहाव्यवस्थापक प्रदीप पॉल उपस्थित होते.

सौंदर्यीकरण आणि विकासासाठी झीरो माईल लगतची शासनाची सर्व जागा यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही निर्देश समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांनी दिले. मनपाच्या जागेवर पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. झीरो माईलचे सौंदर्यीकरण महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात येत आहे. या लगतच्या जागेचा विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे प्राप्त निधीच्या उपयोग करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठकीमध्ये दिली.

नागपूरमधील झीरो माईल ही भारताच्या मध्यभागी आहे. झिरो माईल मार्कर भारताचे भौगोलिक केंद्र दर्शवित आहे. ब्रिटीशांनी झिरो माईल स्टोनची स्थापना केली होती. ज्याने या ठिकाणाचा वापर सर्व अंतर मोजण्यासाठी केला. झीरो माईल स्टोनमध्ये चार घोडे आणि एक वाळूचा खडक असलेला खांब आहे. हे नागपूरच्या विधानभवनच्या जवळ आहे

अतिशय प्राचीन असा इतिहास

महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहराचा अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. नागपुरात गोंड राजापासून ते भोसले राजांनी राज्य केलं. देशाचं झिरो माईल, संत्रानगरी , मिडल ऑफ कंट्री अशा वेगवेगळ्या नावानी या शहराची ओळख आहे. 

नागपूर हे अतिप्राचीन शहर आहे. या शहरांचे उल्लेख १० व्या शतकात मिळालेल्या ताम्रपटात आढळून आला आहे. या शहराची निर्मिती छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडच्या गोंड राज्याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. नाग नदीच्या तीरावर असल्याने शहराला नागपूर हे नाव देण्यात आले.