वाशिम : राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने तारीख वाढवून देण्याची मागणी होत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेतून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहायक, मुख्य सेविका, पशू धन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी यासह विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

expert committee change in policy for determining height of statues
पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
tender process, Abhyudaya Nagar redevelopment,
मुंबई : अभ्युदयनगर पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया तूर्तास लांबणीवर, नियमानुसार ७५० चौ. फुटाचे घर देण्याची रहिवाशांची मागणी
Wardha, mobile phone theft, recovery, police, lost phones, cyber cell, investigation, stolen mobiles, mobile return event, CEIR portal, wardha news, latest news,
वर्धा : ३३ लाखांचे मोबाईल सापडले, मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश

हेही वाचा – ऑगस्ट महिनाअखेरीस अवकाशात दोन मोठ्या खगोलीय घटना

हेही वाचा – गदर यांच्यावरील काव्यसंमेलन थांबवले! पूर्वपरवानगी न घेतल्याने पोलिसांचा आक्षेप

सदर परीक्षेच्या सुरवातीपासूनच परीक्षा शुल्क अवाढव्य असल्याने राज्य भरातील विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच विविध संघटना, नेत्यांनी सरकारविरोधात भाष्य केले होते. त्यामुळे परीक्षा शुल्क कमी होण्याची विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र कुठलेही परीक्षा शुल्क कमी न झाल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. मात्र अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक नेट कॅफे, मोबाईल व मिळेल त्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यातच आज शेवटचा दिवस असून ऑनलाईन सर्व्हर नीट चालत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उमेदवार करत आहे.