नाशिक – राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी विभागात इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडविताना नकल (काॅपी) करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.विभागातील नाशिक १२५, धुळे ४७, जळगाव ८१, नंदुरबार २८ याप्रमाणे २८१ केंद्रांवर परीक्षा होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १३ नवीन केंद्राची भर पडली आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालू राहणार आहे. एक लाख ६८ हजार १९६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी परीक्षा केंद्र गाठतांना पालक व विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. काहींचे केंद्र घरापासून लांब असल्याने त्यांना घरातून लवकर निघणे भाग पडले. परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने केंद्रांवर पालकांनी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि घरी परत नेण्यासाठी गर्दी केल्याने काही वेळासाठी केंद्रांभोवती वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून नंदुरबार येथील संवेदनशील केंद्र तसेच धुळे येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा नजर ठेवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा