लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांद्याचे भाव गडगडल्याने राज्य शासनाने केलेल्या अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासनाने जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले असून त्यांच्या अनुदानापोटी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या पणन विभागाकडे सादर केला आहे. उर्वरित २१ हजार ६६६ उत्पादक अपात्र ठरले आहेत.

The administration is aware of the agitation of the tribals regarding the forest rights claim
शहरबात: आदिवासींच्या ‘सत्याग्रह’ने प्रशासन जागरूक
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
palghar, textile industry project
वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी भूमिहिनांच्या जमिनीवर नांगर ?
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Investigating land fragmentation projects letter of MHADA  a committee has been formed by the Nashik district administration
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन
in Akola many men filed applications for benefits of Ladaki Bahin Yojana
अकोला :‘लाडक्या बहीण’च्या लाभासाठी चक्क भाऊ रांगेत; वाचा नेमकं घडल काय?

प्रस्ताव सादर झाल्यामुळे पुढील दिवसात शासकीय अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती आला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल साडे तीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी गोडसे प्रयत्नशील होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी गळ घातली होती. जिल्हा उपनिबंधकांनी प्रस्ताव मान्यतेसाठी पणन मंडळाकडे पाठविला आहे.

आणखी वाचा-मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हा बंद, आदिवासी संघटनांची हाक

अनुदान कुणाला मिळणार?

जिल्ह्यातील तालुका स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक, खासगी बाजार आणि नाफेड या संस्थांमार्फत कांदा खरेदी केला जातो. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात वरील चारही संस्थांकडून एक कोटी २४ लाख ४६ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला होता. कांद्याचे अनुदान मिळावे यासाठी जिल्हाभरातून १, ९३,८१८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. जिल्हा प्रशासनाच्या छाननीत २१,६६६ शेतकरी अपात्र ठरले असून १, ७२,१५२ शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम ४३५ कोटी ६१ लक्ष २३ हजार ५७८ रुपये आहे. या संबंधीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी शासनाच्या पुणे येथील पणन संचालकांकडे पाठविला आहे.