जळगाव – आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार ६७५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरीच्या ७२ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या खरिपात सर्वाधिक पेरण्या जामनेर तालुक्यात ६८ हजार १९ हेक्टर क्षेत्रात झाल्या आहेत. खानदेशचे नगदी पीक असलेल्या कपाशीची चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक लागवड झाली आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र सात लाख ६९ हजार ६०१ हेक्टर आहे. यंदा खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला. कपाशी लागवडीस उशीर झाला. मात्र, जुलैपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कपाशी आदी प्रमुख पिके घेतली जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा