जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा शुक्रवारी चोपड्याकडून भुसावळकडे जात असताना, यावल तालुक्यातील किनगावनजीक या ताफ्यात पुढे असलेल्या वाहनाने गतिरोधकानजीक अचानक ब्रेक लावला. यामुळे ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर धडकली. यात वाहनाचे नुकसान झाले असून, कार्यकर्ते सुखरूप आहेत.

हेही वाचा – वंचितचेही शक्तिप्रदर्शन; करण गायकर, मालती थवील यांचे अर्ज दाखल

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
हसन मुश्रीफ – समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Bhartiya Janata Yuva Morcha commotion and announcement at Shyam Manavs event
नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि गोंधळ, काय घडले?
devendra fadnavis said about baba siddiquis murder
देवेंद्र फडणवीस म्हणतात,‘बाबा सिद्दिकींची हत्या ही दुर्दैवी घटना; मुख्य सूत्रधार…’
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Thackeray group activists standing outside nagpur airport started aggressively shouting slogans
नागपूर विमानतळावर राडा: नितेश राणेच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक, काय झाले…….?
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

हेही वाचा – केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर, चोपड्यातील सभेत शरद पवार यांची टीका

रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी शरद पवार यांच्या चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळमध्ये जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चोपडा येथील जाहीर सभा झाल्यानंतर शरद पवार हे भुसावळकडे रवाना झाले. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील पुढील मोटारचालकाने किनगावनजीक असलेल्या गतिरोधकाजवळ अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर धडकली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.