नाशिक – चैत्रोत्सवानिमित्त कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पेढा तसेच हलवा विक्रेत्यांकडून पाच लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सप्तश्रृंग गडावर चैत्रोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा >>> भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

meeting at Provincial Office Pandharpur discussed administrative plans for Kartiki Yatra devotees
कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य, कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Under Mission Shakti scheme 345 nurseries servants Madanis will also be appointed in the state Maharashtra Pune news
राज्यात ३४५ पाळणाघरे, सेविका, मदनिसांची नियुक्तीही होणार…
air pollution control, Mumbai Municipal Corporation,
वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Drugs worth one crore seized in Dhule district
धुळे: अबब… एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
RTO Maharashtra, RTO employees, RTO Nagpur,
राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…

गडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करुन मावा पेढे, कंदी पेढे, मलाई पेढे, कलाकंद हे पदार्थ दुधापासून तयार केले असल्याचे भासवत पदार्थांमध्ये काही ठिकाणी भेसळ आढळली. मे. अभिजीत रमेश बोरे पेढा सेंटर या दुकानातून १२४ किलो, मयुरी प्रसाद पेढा सेंटरमधून ८९२ किलो, योगेश तिवारी यांच्या दुकानातून ५३ किलो, मे. श्री माँ भगवती पेढा सेंटर, अशाप्रकारे एकूण एक हजार ९४४ किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील खाद्य पदार्थाचे नमुने ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अन्य माल हा ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ यात्रोत्सवादरम्यान अशी कारवाई न करता कायम अशा प्रकारची तपासणी केली तरच, भेसळीला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.