विनाअट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी बुधवारी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ति सामाजिक संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आदिवासी कोळीढोर, टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हार कोळी आदींचा समावेश होता.

हेही वाचा >>> बक्षी समितीच्या शिफारसींमध्ये अन्याय ; महाराष्ट्र पोलीस परिवाराची तक्रार

March by members of Bidri Slogan against MLA Abitkar
‘बिद्री’च्या सभासदांचा मोर्चा; आमदार आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
cold war, MLA Kisan Kathore, Kapil Patil, Bhiwandi Lok sabha constituency, murbad
पराभवानतंरही कपिल पाटील यांच्या बैठकांच्या धडाक्यामुळे किसन कथोरे समर्थक अस्वस्थ
Devendra FAdnavis on vasai murder case
वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भक्कम पुराव्यानिशी…”
senior citizen who was injured in an attack by thieves died during treatment
चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Gadchiroli, Puttewar murder,
गडचिरोली : ‘पुट्टेवार’ हत्याकांड; अर्चना पुट्टेवार, प्रशांत पार्लेवारची अटक टाळण्यासाठी काँग्रेस नेत्याची…
Armed robbery Mahagaon taluka,
यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण
naxalite camp busted by jawans near chhattisgarh border
गडचिरोली : नक्षल्यांचा आणखी एक तळ उध्वस्त; मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
Pankaja Munde defeated in Beed lok sabha election
मराठवाड्यात भाजपला भोपळा; बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव

आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांच्यावर आदिवासी विभागाच्या निष्काळजीपणाने वर्षानुवर्ष अन्याय होत आहे. १९५० पूर्वीच्या कोळी नोंदींवर खान्देशातील मूळ आदिवासी असा उल्लेख असूनही  संबंधित विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचेचे प्रमाणपत्र प्रांताधिकारी देत नाहीत. जात वैधता प्रमाणपत्रही देण्यात येत नाही. कोणत्याही आदिवासीं योजनांचा आदिवासी कोळी यांना लाभ किंवा सवलतही मिळत नाही. यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. न्याय मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो वंचित आदिवासी कोळी समाजातील नागरिकांनी महाआक्रोश मोर्चा काढला.