पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेकांची पावले धबधबा, धरण परिसराकडे वळतात. पावसाच्या सरी अंगावर झेलत अशा ठिकाणी भटकंतीची अनेकांची इच्छा असते. चोखंदळ पर्यटनप्रेमींच्या अशा आवडीनिवडी जपण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निसर्गसौंदर्याने नटलेल्या भावली धरण परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा विचार केला आहे.

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Dharashiv railway station to be tripled in size with modern facilities
अद्ययावत सुविधांसह रेल्वेस्थानक होणार तिप्पट मोठे
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झाली आहे. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या या तालुक्यात अनेक धरण आहेत. पावसाळ्यात परिसरात भ्रमंतीसाठी येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटरवर असणाऱ्या भावली धरण परिसरात या काळात ओथंबून वाहणारे धबधबे सर्वाना आकृष्ट करतात. स्थानिक पातळीवरील ही वैशिष्टय़ हेरत मंडळाने भावली धरण आणि लगत वाहणारी नदी याचा विचार करत हे क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  कुंभमेळ्यादरम्यान मंडळाने ‘नदीकाठी वसलेले गांव’ ही संकल्पना मांडली होती.

त्या अंतर्गत धरणाच्या बॅक वॉटर परिसरात निवासी तंबूंची व्यवस्था करण्यात आली.

मात्र सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाल्यावर तो प्रकल्प तितकासा तग धरू शकला नाही. या प्रकल्पाच्या सर्व शक्यता, त्यातील अडचणीवर काय तोडगा काढता येईल, याचा विचार करत मंडळाने आपल्या स्तरावर भावली धरण परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, सर्व वयोगटाच्या गरजा लक्षात घेत सोयी सुविधा, त्यासाठी लागणारा निधी या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

धरण परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. निवास व्यवस्थेसाठी तंबूची उभारणी, लहान मुलांसह तरुण व क्रीडाप्रेमींकरिता साहसी खेळांची व्यवस्था करण्याचा विचार आहे. याशिवाय भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध वयोगटानुसार कोणते नवीन प्रकल्प हाती घेता येतील या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.

तंबूला पर्याय म्हणून अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त निवास व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी दिली.

Story img Loader