धुळे : शहरातील मोगलाई भागातील प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी भाजपसह समस्त हिंदू संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप जाधव, ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे आदींसह जिल्ह्यातील समविचारी संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला.

हेही वाचा… अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू

शिवाजी पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Plastic Flower Ban , Plastic Flower, Central Government ,
म्हणून सजावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात ही भूमिका
pune police action against vendors selling tobacco products near schools and colleges
शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या जमीनदोस्त, हडपसर भागात पोलिसांची कारवाई
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?

हेही वाचा… माधवी साळवे यांचा मार्गच वेगळा; राज्य परिवहन नाशिक विभागातील पहिल्या महिला बस चालक होण्याचा मान

आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली. विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ही मुख्य मागणी मोर्चेकऱ्यांची आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती ठेवण्यात आली होती. आग्रा रोड, कराचीवाला खुंट, महापालिकेची जुनी इमारत, महापालिकेची नवी इमारत आणि तेथून साक्री रस्तामार्गे शिवतीर्थावर या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. मुख्य बाजारपेठ सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड लक्ष ठेवून आहेत. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader