नाशिक – मराठा आरक्षणावरून ठिकठिकाणी मराठ्यांकडून ओबीसींना लक्ष्य करुन मारहाण करण्यात येत आहे. दुर्देवाने पोलीस ही परिस्थिती हाताळण्यात मागे पडत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

शनिवारी येवला येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या गावोगावी मराठा आरक्षणावरून विजयोत्सव सुरू आहे. असे असताना आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसण्याची तयारी का, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. सर्व्हेक्षण, नोंदणी, जे मागितले ते कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, याविषयी संभ्रम आहे. मराठ्यांकडून ओबीसींवर बहिष्कार टाकला जात आहे. पोलीस या प्रकरणात अपेक्षित असे सक्रिय नाहीत. यामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून वेगळाच प्रश्न निर्माण होईल. यामुळे सर्व पक्षांचे प्रमुख, राज्याचे प्रमुख, लोकसेवक, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत विचार करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.

Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?
Nanded Crime News
ऑनलाईन जुगारामुळे कर्ज झाल्याने वृद्धेची हत्या करुन दागिन्यांची चोरी
minor stabbed with koyta over enmity
पुणे : वैमनस्यातून अल्पवयीनावर कोयत्याने वार
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: सुपारी, शेण, नारळ…
Two thousand police personnel for Maratha reservation peace walk smooth traffic due to police planning
मराठा आरक्षण शांतता फेरीसाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत
raid, gambling, Lonavala, Lonavala gambling den,
लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून १४ जणांवर गुन्हा

हेही वाचा >>>मुसळगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखान्याला भीषण आग

पालघर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या विषयावर, भुजबळ यांनी, फडणवीस यात काय करणार, असा प्रश्न केला. ते दोन लोकांचे भांडण आहे. आपल्यालाही एक आमदार घाणेरडे बोलत आहे. धमकी देत आहे. फडणवीस केवळ अशा प्रकरणात एखाद्याला समज देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. ओबीसींना हरिभाऊ राठोड यांनी सर्वाधिक मुर्ख बनवले आहे. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहावे, तायवाडे किंवा अन्य लोकांची केवळ मते आहेत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.