मालेगाव : वीज चोरी रोखण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनीने ‘स्मार्ट प्रीपेड’ वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असला तरी हा रोगापेक्षा इलाज जालीम असा प्रकार असल्याची तक्रार करत हिंदू-मुस्लिम एकता संघटनेतर्फे सोमवारी ‘स्मार्ट प्रीपेड’ वीज मीटर विरोधात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने रोजी एक आदेश काढून नाशिक व जळगाव क्षेत्रात एनसीसी कंपनीला ३४६१.०६ कोटी रुपये खर्च करून २८८६६२२ प्रीपेड मीटर बसविण्यासाठी काम दिले आहे. मालेगावसारख्या शहरात रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना प्रीपेड मीटर परवडणे शक्य नाही. सध्याच्या व्यवस्थेनुसार देयक देण्यासाठी आठ ते दहा दिवस मुदत मिळते, ती प्रीपेड मीटरमध्ये मिळणार नाही, रिचार्ज संपल्यास आपोआप वीज पुरवठा खंडित होईल. रिचार्ज करायला पैसे नसणाऱ्यांना वीज पुरवठा होऊ शकणार नाही.त्यातून भविष्यात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा