नाशिक: संविधानाच्या मूळ प्रतीत छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोबिंद सिंग, गौतम बुद्ध, महावीर, श्रीराम अशी असंख्य चित्रे होती. ती नंतर काढण्यात आली. ही दैवते राष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यांची चित्रे समाविष्ट करून संविधानाची पुन्हा छपाई करावी, यासाठी विधीमंडळात तसा प्रस्ताव मांडावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.

येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्काराने रविवारी सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांना राज्यपाल बागडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान इंग्रजीत होते, असे नमूद केले. त्या संविधानाची छपाई नाशिकरोडच्या चलनी नोटा छापणाऱ्या मुद्रणालयात झाली होती.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pankaja munde
नवीन पक्ष निर्माण होण्याइतपत गोपीनाथ मुंडे प्रेमींची संख्या, पंकजा मुंडे यांचा दावा
ganja plants cultivated for commercial purposes on forest land at Rupsingpada shirpur
धुळे जिल्ह्यात दोन कोटींची गांजा झाडे जप्त
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

मुद्रणालयातील वैद्य नामक व्यक्तीने त्याचे हिंदीत भाषांतर केले. छायाचित्र समाविष्ट असणाऱ्या संविधानाची एक प्रत आपल्याकडे असून ती शाळेत सर्वांना पाहण्यासाठी ठेवली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मूळ संविधानात जी चित्रे होती, ती पुन्हा समाविष्ट करून छपाई होणे आवश्यक आहे. त्यास कोण विरोध करते ते आपण पाहू, असा इशाराही बागडे यांनी दिला.

शहरी नक्षलवाद लोकशाहीसमोरील धोका -शेलार

शहरी नक्षलवाद हा लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका आहे. समाजात फूट पाडणे, राष्ट्रवादी विचारधारेला पराभूत करणे आणि न्यायालय, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आदी व्यवस्थेला चुकीचे ठरवून नष्ट करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत. एखादा मोठा नेता पगडीवरून वाद निर्माण करून विभाजन करतो. काही सनातन धर्माला बोल लावतात. हिंदूहृदयसम्राटांचा पुत्र म्हणणारा यातील एक, असे सांगत सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता टिकास्त्र सोडले.

Story img Loader