तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीची दाहकता तब्बल १७ तासानंतरही कायम असल्याचे दिसून आले. शेतीच्या बांधांवर गारांचा खच दिसून आला आहे. गारपिटीमुळे कांदा, पपई, टरबूज, टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनाम्यांविषयी साशंकता आहे. शुक्रवारी सायंकाळी एक तासापेक्षा अधिक वेळ तालुक्यातील आष्टे, गोगळपाडा, सुतारपाडा, ठाणेपाडा यासह इतर गावांमध्ये झालेल्या गारपिटीस सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले.

हेही वाचा >>> घोटी, माणिकखांब रेल्वेव्दार दोन दिवस बंद

Forest department ignorance about elephant capture campaign in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती पकड मोहिमेबद्दल वनविभाग उदासीन; १० फेब्रुवारी पासून साखळी उपोषण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
three bodies found in lake in tuljapur taluka
तलावात आढळले तीन मृतदेह; तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात खळबळ
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
Villages that provide agricultural land for development projects are deserted
विकास प्रकल्पांना शेतजमिनी देणारी गावे ओसाड

काढणीला आलेला कांदा आडवा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पपई, टरबूज, खरबूज, गहू, मका, हरभरा, टोमॅटो यांनाही अवकाळीचा फटका बसला. दुसरीकडे पंचनाम्यासाठी कोणी येत नसल्याची चिंता  शेतकऱ्यांना आहे. सरकारी कर्मचारी संपावर असल्याने या पिकांचे पंचनामे करणार तरी कोण, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरसकट मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आष्टे परिसरात नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ पंचनाम्यासाठी येण्याची मागणी केली असून संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून ठेवण्याचा पर्याय सूचविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader