लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळणाऱ्या निराधार विधवा महिलांचाही समावेश करावा, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.

vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Attendance of 54 candidates in Sunday police recruitment
रविवारच्या पोलीस भरतीत ५४ उमेदवारांची उपस्थिती
Pm narendra modi salary
पंतप्रधान मोदींचे दरमहा वेतन किती? कोणत्या जागतिक नेत्याचे वेतन सर्वाधिक?
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा

राज्यात संजय गांधी निराधार योजनेतंर्गत सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या १५.९७ लाख तर, इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळणाऱ्या ११.१४ लाख महिला आहेत. अशा एकूण २७ लाख महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहतील. शासन निर्णयात या योजनेसाठी अपात्र कोण असेल, अशी यादी बघितल्यास ज्या महिलांना १५०० रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते, त्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील, असे स्पष्टपणे म्हटले आहे. याचा अर्थ संबंधित २७ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकिकडे पाच वर्षे आमदारकी केली तरी सेवानिवृत्ती वेतन मिळते. एका कुटुंबात अनेक कर्मचारी असतील तरी वेतन, सेवानिवृत्त वेतन कपातीचा कोणताच निकष नसतो. गरीब कुटुंबातील एकल निराधार महिलांना फक्त १५०० रुपये जास्त देताना त्या जणू सेवानिवृत्ती वेतन घेऊन श्रीमंत झाल्या, असा सरकार अर्थ घेते हे अतिशय क्रूर असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा-वसंत गिते यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याचे, जागेचे भाडे वसूल करा; देवयानी फरांदे यांची मागणी

एकिकडे महिलांसाठी खूप काही करीत असल्याचा आव आणून निवडणुकीसाठी वातावरण तयार करून महिलांना आशा दाखवायची आणि दुसरीकडे गरजू महिलांना वगळायचे, असे करून महिलांच्या भावनेशी खेळू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालून विधवा महिलांचा समावेश या योजनेत करावा, अशी मागणी साऊ एकल महिला समितीच्या वतीने करण्यात आली आहे.