लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे दीड-दोन लाख लोकसंख्येच्या धरणगाव या तालुक्याच्या शहरात गेल्या २२ दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी कामे सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. जलकुंभाला लागलेल्या गळती काढण्याचे काम सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे थेच आहे. महिनाभरात दोन तास पाणी मिळाल्याची व्यथा धरणगावकरांनी मांडली.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना

उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. सध्या धरणगावकर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाणी आणायच्या कामात लहान मुलांचीही मदत घेतली जात आहे.

हेही वाचा… नाशिक: बड्या थकबाकीदारांचे आता गावोगावी फलक

सोमवारी (8 मे) शहरातील मलाकली गल्ली, बेलदार गल्ली, पिल्लू मस्जीद या गल्लीतील महिलांनी पालिकेवर धडक दिली. मात्र, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी न भेटल्याने पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात एक एप्रिलपासून दोन दिवसांआड पाणी देऊ, असे आश्‍वासित केले होते. मात्र, मे महिना सुरू होऊनही २२ दिवसांपासून पाणी नाही, तर तो एप्रिल फुल होता का, असा प्रश्‍न यावेळी महिलांनी उपस्थित करून पाणीपुरवठामंत्री पाटील यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या २५ वर्षांपासून पाणीप्रश्‍न कायमच असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. वाघ यांनी थेट पालिका गाठली. त्यांनी महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या.

हेही वाचा… फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव राज ठाकरे का घेत नाही- छगन भुजबळ यांचा प्रश्न

पाणीपुरवठामंत्री मस्त, धरणगावकर त्रस्त – वाघ

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने वीस दिवसांपूर्वी मुख्याधिकारी पवार यांची भेट घेत पाणीप्रश्‍नासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. आता २२ दिवस उलटूनही अधिकार्‍यांकडून पाणीप्रश्‍न सोडविला जात नाही. यासाठी जबाबदार कोण? पालकमंत्री जबाबदार नसतील तर त्यांचे मतदारसंघात लक्ष नसेल. पाणीपुरवठामंत्र्यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मंत्री मस्त, नागरिक त्रस्त असेच म्हणावे लागेल.

पालिकेवर प्रशासक असल्याने त्यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? तू माझ्याकडे पाहा, मी तुझ्याकडे पाहतो, असे बोबाटपणे, सर्रासपणे सुरू आहे, असा घणाघात शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर पाणीप्रश्‍नावर केला. याप्रसंगी नगरसेवक जितेंद्र धनगर, संजय चौधरी, विनोद रोकडे आदी उपस्थित होते.

Story img Loader