लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: पंचवटी विभागात पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले असून अनेक इमारतीत वारंवार टँकरने पाणी मागवावे लागत आहे. मनपाकडून केवळ तासभर कमी दाबाने पाणी पुरविले जाते. दुसरीकडे अंदाजे पाणी देयके वसूल केली जातात. हा स्थानिकांवर अन्याय असल्याची तक्रार करीत पाणी टंचाईसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded shocking video goes viral
VIDEO: लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
Shocking video sister makes reel in front of brothers corpse consoles bhabhi video viral
“अरे जरा तरी लाज वाटू द्या” मागे भावाचा मृतदेह, वहिनी धाय मोकलून रडतेय अन् नणंद रिल्स बनवण्यात व्यस्त; VIDEO पाहून धक्का बसेल
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
Villagers shared their experience after explosion in ordnance manufacturing company Bhandara
जोरदार आवाज झाला, पत्रे उडाले; स्फोटानंतर ग्रामस्थांनी सांगितला अनुभव
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल

ॲड. सुरेश आव्हाड, हाजी मोईयोद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. पंचवटीतील सत्यदेवनगर, काकडनगर, रामकृष्णनगर, मनपा कॉलनी, मानकर मळा, म्हाडा कॉलनी आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या भागात पाणी पुरवठ्याची वेळ एक तासाची ठेवली गेली असून तोही अवेळी होतो. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अंदाजे पूर्ण पाणीपट्टी वसूल करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

हेही वाचा… नाशिक: रायगडमधील दुर्घटनेला सरकारी अनास्था जबाबदार , राजू शेट्टी यांचे टिकास्त्र

तवली डोंगरालगतच्या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. परंतु, या भागात रस्त्यांची कामे झालेली नसल्याने स्थानिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. पेठ रस्त्यावर जकात नाका ते राऊ हॉटेल चौकापर्यंत आरटीओ कॉर्नर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अर्ज करूनही घरपट्टीची आकारणी होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन तक्रारी करूनही दखल न घेता बंद केल्या जातात. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Story img Loader