लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: उन्हाची दाहकता वाढू लागल्याने जिल्ह्यात टंचाई जाणविण्यास सुरूवात झाली आहे. शहरात काही ठिकाणी कृत्रिम टंचाईवरुन आरोप-प्रत्यारोप होत असतांना ग्रामीण भागात पाणी नियोजनाचे कारण पुढे करुन वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायतीतंर्गत असलेल्या खैरेवाडी येथील विहीरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक स्वरुप धारण केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
unsafe drinking water in 55 places in Pune
Pune GBS Updates : पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
municipal commissioner bhushan gagrani inspected Sewage treatment center progress near sea setun bandra west
वांद्रयातील मलजल प्रक्रिया केंद्र जुलै २०२७ पर्यंत केंद्र कार्यान्वित करणार, मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती

इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथे चार ते पाच पाडे आहेत. गावात दोन विहीरी आहेत. एका विहीरीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून गावाची तहान दुसरी विहीर भागवत आहे. विहिरीत साधारणत: पुढील दीड ते दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाची वाढती दाहकता आणि टंचाईचे संकट लक्षात घेता पुढील दिवसांमध्ये पाणी पुरणार नाही, असे कारण देत येथील विहीरीतून नळ योजनेला होणारा सौर उर्जा प्रकल्पावरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महिलांना हंड्याने पाणी आणा, असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तीन दिवसांपासून नळाला पाणी नाही. महिलांना तसेच गावातील मुलांना, युवकांना विहीरीवर जावून पाणी भरावे लागत आहे.

आणखी वाचा- अट्रावल दंगल प्रकरणी १७ संशयितांना पोलीस कोठडी ; २०५ संशयितांविरुद्ध गुन्हा

पाणी नियोजनाचे कारण पुढे करत वीज पुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. पंचायत समितीवर बुधवारी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांसह ग्रामस्थांनी दिला. याविषयी एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी माहिती दिली. आदिवासी भागात पाणी बचतीचा संदेश देण्यापेक्षा शहरी भागात याविषयी प्रबोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विहीरी तळ गाठत असल्याने याविषयी प्रस्ताव सादर करुन जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करा, असे सूचवितानाच कुठलाही लेखी आदेश नसतांना वीज पुरवठा खंडित का करण्यात आला, असा प्रश्न मधे यांनी उपस्थित केला. याविषयी ग्रामसेवक मनोहर सुरवाडे यांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, असे सांगितले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मंगळवारी दुपारनंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. आता पाणी किती दिवस पुरेल, त्याचे नियोजन लोकांच्या हातात असल्याचे नमूद केले.

Story img Loader