जळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी जलसंकट उभे राहण्याची शक्यता असून, आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. गतवर्षी २८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये ७३.६७ टक्के जलसाठा होता. सप्टेंबरमधील परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १३ गावांत १५ टँकर सुरू आहेत.

जून कोरडा गेला. जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण तुरळकच राहिले. पिके करपू लागली आहेत. सद्यःस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, जळगाव, चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव परिसरात यंदा दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर प्रकल्प मिळून सुमारे ४२.११ टक्के जलसाठा असून, अग्नावती व हिवरा प्रकल्प कोरडेठाक आहेत. बोरी, बहुळा, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

Dairy Development Project expand from 11 to 19 districts in Vidarbha and Marathwada
दुग्धविकास प्रकल्पाची व्याप्ती वाढली; शेतकऱ्यांना १३,४०० दुधाळ जनावरांचे…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा : धुळे मनपातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, आयुक्तांकडून कारवाईची शक्यता

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, विसापूर तांडा, अंधारी, हातगाव, करंजगाव, कृष्णापूर, जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, जळांद्री बुद्रुक, सोनारी, करमाड, पाचोरा तालुक्यातील लोहारा व भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा या गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.