नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याचा लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जाताना अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरने कांदा घेऊन जात असताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना संबंधित शेतकरी ट्रॅक्टरच्या चाकाजवळ पडला, या भयावह घटनेत शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.

अजय नानासाहेब उगले असं ३० वर्षीय मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मृत अजय उगले हे आज (शनिवार) कांद्याने भरलेला ट्रॅकर घेऊन मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घेऊन गेले होते. पण तिथे कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे त्यांनी वडिलांशी चर्चा केली आणि लासलगाव येथे कांद्याला जास्त भाव मिळेल, असं सांगितलं.

Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Tiger calf found dead in Shiwar Dongargaon farm near Mula taluka and Savli
वाघाचा बछडा मृतावस्थेत….वन विभाग म्हणते, सापाने…..
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
father thrown his two dauthers in river in buldhana district
पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
buldhana person drowned
बुलढाणा: चौथ्या दिवशी सापडला एकाचा मृतदेह; दोघे बापलेक मात्र बेपत्ताच

यानंतर, मृत शेतकरी अजय उगले हे कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी ट्रॅक्टर घेऊन लासलगावच्या दिशेनं निघाले. दरम्यान, चांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना शेतकरी अजय उगले यांच्या हातातून ट्रॅक्टरची स्टेरिंग सुटली आणि ते चाकाजवळ पडले. त्यानंतर क्षणार्धात ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबले. या दुर्दैवी अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अजय उगले यांना बाहेर काढून मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.