नाशिक – देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकऱ्याने मध्यरात्री घरालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चाळीत साठविलेला कांदा खराब झाल्यामुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची, या विवंंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

प्रताप बापू जाधव (३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. अल्प शेतीत कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकत होते. सातत्याने नापिकीला त्यांना तोंड द्यावे लागत होते. यावर्षी पावसाने ओढ दिली. उन्हाळ्यात खर्च करून कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र तोही पूर्णतः खराब झाला. बँक कर्ज देत नसल्याने या संकटात अधिकच भर पडली. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत असलेल्या जाधव यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता नातेवाईक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
19 year old girl dies after being hit by dumper accident in baner area
डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू; बाणेर भागात अपघात, दुचाकीस्वार महिला जखमी
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

हेही वाचा >>>लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडा

शुक्रवारी रात्री घरातील मंडळी झोपली असताना जाधव यांनी घरालगतच्या विहिरीत उडी घेतली. शनिवारी सकाळी जाधव हे घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यांचे स्वेटर विहिरीजवळ आढळून आले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच आसपासच्या नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Story img Loader