लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जळगाव, मनमाड – भुसावळ विभाग रेल्वे पोलीस, सुरक्षा दल आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त कारवाईमुळे दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून होणारी ५९ बालकांची तस्करी रोखण्यात यश आले आहे. भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बालकांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
कारागृहातून सुटल्यानंतर गोंधळ; साताऱ्यात नऊ जणांवर गुन्हा
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक

बिहारमधील दानापूरहून निघालेल्या पुणे एक्स्प्रेसमधून बालकांची तस्करी होत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेने रेल्वे पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भुसावळ विभागाचे रेल्वे पोलीस, सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस यांनी एक्स्प्रेस मंगळवारी भुसावळ स्थानकात येताच तपासणी करण्यास सुरूवात केली. वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलेल्या आठ ते १५ वयोगटातील ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना स्थानकात उतरवून त्यांच्या सोबत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत रेल्वेत शोध मोहीम करण्यात आली. यावेळी गाडीत २९ मुले आणि चार संशयित हाती लागले. त्यांना मनमाड रेल्वे स्थानकात उतरविण्यात आले.

हेही वाचा… शासन-सार्वजनिक-खासगी भागीदारीवर नाशिकचा विकास शक्य; ‘मी नाशिककर’तर्फे भविष्यकालीन आराखडा सादर

भुसावळ येथे मिळालेल्या ३० बालकांना जळगाव येथील बालसुधार गृहात पाठविण्यात आलमनमाडहून रवाना करण्यात आलेली २९ बालके बुधवारी सकाळी नाशिक येथे आली. त्यांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्यात आले. त्यांचे समुपदेशन करुन नेमके काय झाले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा… अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे या मुलांना नेण्यात येणार होते, अशी माहिती चौकशीत या संशयितांनी दिली आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा गणवेश परिधान करण्यात आला होता. मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ५९ मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून, ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बालकांशी संवाद साधण्यात भाषेची अडचण आली. खाणाखूणा तसेच अन्य लोकांच्या मदतीने बालकांशी संवाद साधण्यात येत आहे. बालके घाबरली असून बोलण्यास कचरत असल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी भुसावळ आणि मनमाड येथे केलेल्या कारवाईत ५९ बालके सापडली आहेत. नाशिक येथे आलेल्या या बालकांशी बाल कल्याण समितीचे अधिकारी, सदस्य संवाद साधत आहेत. हा प्रकार कसा घडला, कारणे आदींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. – सुवर्णा वाघ (रेल्वे पोलीस, नाशिक)

Story img Loader