तालुक्यातील ८४ गावे पाण्याच्या प्रतिक्षेत असतानाही जिल्हा प्रशासन अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला. वेळीच शर्मांनी मागे होत पाटलांना सावरले. लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले. या संदर्भात प्रा. पाटील यांनी भूमिका मांडली. अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यासंदर्भात प्रशासनाला वारंवार विनंत्या करुन थकलो आहे.

हेही वाचा >>> नाशिक: आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी; राज्यात तीन लाख मेट्रिक टनची खरेदी होणार

Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

पाण्यासाठी बळीराजा तळमळतोय, तरी प्रशासनाकडून उचित कार्यवाही होत नाही. दुसरीकडे सत्ताधारी वाडीशेवाडी सारख्या प्रकल्पांमधून मनमर्जीप्रमाणे आपल्या मतदारसंघात पाण्याची व्यवस्था करतात. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना मुद्दामहून वेठीस धरले जाते. अक्कलपाड्यातील उपलब्ध २७०० द.ल.घ.फू जलसाठ्यापैकी आम्ही केवळ २५० ते ३०० द.ल.घ.फू पाण्याची मागणी करत आहोत. तरीही जिल्हाधिकारी जलज शर्मा असंवेदनशीलता दाखवित आहेत, असा आरोप प्रा.पाटील यांनी केला. दोन दिवसात अक्कलपाडा धरणातून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रा.पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, कैलास पाटील, प्रकाश वाघ यांच्यासह कळंबू येथील राज राजपूत, मिलींद भावसार (अजंदे), बापू बडगुजर (मुडी), विकास बावरा (बोदडे), रतिलाल पाटील (अजंदे) आदींनी दिला आहे.

Story img Loader