लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने गुरुवारी सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Contractual workers of Navi Mumbai civic body to launch strike for equal pay
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून  कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
foreign bank official coming nagpur for 25 years for tiger tourism never seen tiger cm devendra fadnavis
“२५ वर्षांपासून भारतात येतोय, पण कधी वाघ दिसला नाही अन् आज..” विदेशी बँकेच्या उपाध्यक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच सांगितला किस्सा
The Hindu Lunisolar Calendar information in marathi
काळाचे गणित : बिनमहिन्यांचं वर्ष!
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद

उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता, तसेच पावसाला विलंबाने सुरुवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना विस्कळित झाल्याने जलसंकटाला तोंड द्यावे लागते की काय, असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मात्र, उशिरा का होईना रावेर तालुक्यात व मध्य प्रदेशात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तापी नदीला पूर आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे भुसावळ शहरासह तापी नदीवर अवलंबून असलेल्या गावांतील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासनाने धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे ४८०३ क्यूसेक विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

Story img Loader