लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : पक्षसंघटनेत काम करताना अनेकांना संधी द्याव्या लागतात, तर अनेकदा थांबावे लागते.कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए. टी. नाना पाटील, स्मिता वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे जिल्ह्यातील देता येतील. त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाणे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांतच त्यांना त्यांची जागा कळेल, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांना हाणला.

Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Loksatta readers reactions on lokrang article
पडसाद : दबंग, पण सहृदयी अधिकारी
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

चाळीसगाव येथे झालेल्या महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री महाजन यांनी भाजप सोडून गेलेले उन्मेष पाटील आणि करण पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. जनतेचा विश्वास मोदींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजप व मोदींवर प्रेम करणारा असल्याने सर्व स्तरांतील मतदार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा सार्थ ठरवतील, असे महाजन म्हणाले.

आणखी वाचा-सुबह का भुला, शामको घर वापस….खडसेंविषयी गुलाबराव पाटील यांचे विधान चर्चेत

आमदार मंगेश चव्हाण यांनीही उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली. ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित घराणेशाहीविरोधात संघर्ष उभा केला. खटले अंगावर घेतले, त्याच घराणेशाहीच्या दारी यांनी लोटांगण घातले, त्यामुळे अशा प्रवृत्तीला गाडण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

मेळाव्याला महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, माजी मंत्री एम. के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.

Story img Loader