जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा चढतोय आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा अनुभव घेतलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, आता आम्ही नवरदेववाले आहोत आणि तुम्ही नवरीवाले आहेत, असे सूचक वक्तव्य भाजपसंदर्भात केले.

 जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात स्पष्टीकरण दिले. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे मदत केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेना उमेदवारांसमोर बंडखोर उभे करून रणनीती आखत खेळी खेळली होती. अख्खा महाराष्ट्र हे जाणतो. ज्यावेळी आमची वेळ येते, तेव्हा भाजपनेही आमच्यासाठी काम करावे. आता आम्ही नवरदेववाले आहोत आणि ते नवरीवाले आहेत. आगामी होऊ घातलेल्या विधानसभेवेळी ते नवरदेववाले राहणार आणि आम्ही नवरीवाले राहू. एकमेकांना मदत करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

हेही वाचा >>>नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा, संशयित ताब्यात

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मदत केली पाहिजे, अशीच अपेक्षा आमची आहे. गेल्या काळातील चुकांची आगामी विधानसभेवेळी पुनरावृत्ती होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्या आगामी काळात घडणार नाही, अशी ग्वाही राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी दिल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

हेही वाचा >>>नाशिक: महाराष्ट्र अंनिसतर्फे देहदान, अवयवदान सप्ताह

सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्याच्या मुद्यावर पालकमंत्री पाटील यांनी, ठाकरे गटाला चांगला व सर्वदृष्टीने संपन्न उमेदवार मिळेल, असे वाटत नाही, असे सांगितले.. शिवसेनेतून उठाव केल्यानंतर हे गद्दार आहेत, खोकेवाले आहेत, अमुक आहे, ढमुक आहेत, असे आरोप आमच्यावर करण्यात आले. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यांना उमेदवार भेटत नाही, यावरून आम्ही हा बालेकिल्ला करुन ठेवला, हे आता सिद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Story img Loader