धुळे – महापालिकेवर ४५० कोटींचा बोजा असेल तर जनतेला सुविधा मिळणार कशा, महानगर पालिका जनतेला सुविधा देत नसेल तर जनतेनेही मालमत्ता कर का भरावा, असे प्रश्न उपस्थित करीत जनतेने मालमत्ता करच भरु नये, असे आवाहन सत्ताधारी भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी महासभेत करीत घरचा आहेर दिला. महासभेला महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देविदास टेकाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> धुळे: अडीच लाख वसुलीसाठी दोंडाईचात तरुणावर हल्ला ; तिघांविरुध्द गुन्हा

eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Nagpur, Ganga Jamuna nagpur, Police transfered,
नागपूर : ‘रेड लाइट एरिया’तील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची अखेर उचलबांगडी; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”

भाजपचे शितल नवले यांनी सुधारीत आकृतीबंध तयार करुन त्यानंतर सरळ सेवा भरतीला मंजुरी द्या, पदोन्नतीदेखील संथगतीने सुरु असल्याचा मुद्दा मांडला. नागसेन बोरसे यांनी सरळसेवा भरतीतून पदे भरली जावीत, अशी मागणी केली. धुळे वगळता राज्यातील सर्व महापालिकांनी मागासवर्गीयांची पदे भरली आहेत. मग, धुळ्यातच मागासवर्गीयांच्या भरतीला विरोध का होतो, असा प्रश्न त्यांनी केला. ज्यावेळी भरतीसाठी या पदांचा विचार होतो. तेव्हा आस्थापना खर्च पुढे केला जातो. अलिकडेच ११ अभियंत्यांना महापालिकेने भरती केले आहे. त्यात एक पद अतिरिक्त आहे. जर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर या पदभरतीच्या वेळीच महापालिकेची आर्थिक बिकट का होते, महापालिकेवर ४५०कोटींचा बोजा असेल तर जनतेला सुविधा मिळणार कशा, सुविधा देत नसताना  जनतेेने मालमत्ता कर का भरावा, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.