भुसावळ : तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या मुक्ताई सागर (हतनूर) धरणाच्या म्हणजेच तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे १८ दरवाजे शनिवारी सकाळी दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाचे अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे शनिवारी मुक्ताई सागर धरणाच्या पातळीत वाढ झाली. सकाळी नऊ वाजता धरणाचे १८ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून ७५८९२ क्युसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हेही वाचा : मालमोटारीखाली दबून सोनगीर रुग्णालयातील महिला डॉक्टरचा मृत्यू

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Explosion at Chandrapur power station 500 MW unit shut down Power station keeps secrecy
चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट, ५०० मेगावॉटचा संच बंद; वीज केंद्राकडून गुप्तता…

धरणात एकूण पाणी साठा ३४५ दशलक्ष घनमीटर (८९.०५ टक्के) तर पाणी पातळी २१३.२७० मीटर इतकी आहे, अशी माहिती अभियंता चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महिनाभरानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. चाळीसगाव परिसरात दोन महिन्यांनंतर पावसाचे आगमन झाले. पाऊस काही दिवस कायम राहिल्यास जनावरांच्या चारापाण्याच्या समस्येची तीव्रता कमी होऊन रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे

Story img Loader