धुळे : शहराला पाणी पुरवणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीला लागणारी गळती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. या योजनेला बाभळे (ता.शिंदखेडा) शिवारात जलशुद्धीकरण केंद्रासमोर सुरू झालेली गळती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मुंबई-आग्रा महामार्गालगतच ही जलवाहिनी आहे. गळतीमुळे शहरातील अनेक वसाहतींतील पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले. शिवाय पाण्याची नासाडी आणि महापालिकेच्या तांत्रिक यंत्रणेचीही धावपळ झाली.

बोलबाला झालेल्या अक्कलपाडा योजनेचाही गळतीनेच शुभारंभ झाला आहे. या दोन्ही योजनांतून किमान आठवडाभरही विना गळती पाणी पुरवठा झालेला नाही. शहराला तापी आणि अक्कलपाडा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी पुरवठा केला जातो. यांपैकी किमान ८० टक्के भागात एकट्या तापी योजनेतून पाणी पुरविले जाते.

Kothrud Police Arrest Thieves Who Did Chain Snatching Pune news
चेनस्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांना बेड्याच; परराज्यातील आरोपीचा समावेश  
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

हेही वाचा : मालेगावात रोहिंगे, बांगलादेशी आढळल्यास राजकारणातून संन्यास, माजी आमदार आसिफ शेख यांचे आव्हान

सद्या शहरातील विविध वसाहतीत चार ते पाच किंवा आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. गेल्या आठवड्यात बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा जवळपास १६० कोटी रुपये खर्चाच्या अक्कलपाडा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली होती, यामुळे देवपुरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. ‘तापी पाणी पुरवठा योजनेला लागलेली गळती थांबविण्यात आली आहे. हे काम पहाटे तीन वाजता पूर्ण झाले. यानंतर तापी पाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे’, अशी माहिती धुळे महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत ओगले यांनी दिली.