नाशिक : मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल (ओव्हर ब्रिज) मध्यरात्री खचला असून बुधवारी पहाटे त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला असून यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. पण यामुळे मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : नंदुरबार : मनोरुग्ण रेल्वेच्या विद्युत खांबावर चढला, अन…

dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
thane creek bridge 3 loksatta news
ठाणे खाडी पूल ३ : दक्षिणेकडील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीअखेरीस मार्गिका वाहतूक सेवेत
Construction of Vadhavan Igatpuri highway to be handed over to NHAI Mumbai news
वाढवण-इगतपुरी महामार्गात निधीटंचाईचा ‘गतिरोधक’; संपूर्ण महामार्गच ‘एनएचएआय’कडे देण्याचा मुख्य सचिवांच्या बैठकीत सूर
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
passengers struggled due to western railway mega block on Saturday
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. या परिस्थितीत पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान जुन्या पुलाचा पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. सुरक्षा कथड्यासह मातीचा ढिगारा खाली गेला. यावेळी पुलावर वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.

पुलाची जबाबदारी टोल कंपनीकडे

पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. गेल्या १५ वर्षांपासून हा पूल एमएमकेपीएल या टोल कंपनीकडे बीओटी तत्वावर हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम काम याच कंपनीकडे होते. हा पूल आणि महामार्ग धोकादायक असून वळण रस्ता करण्यात यावा, अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे.

Story img Loader