नंदुरबार: जमिनीच्या पोटात अनेक आश्चर्य दडलेली आहेत, असे म्हणतात. त्यांचा केव्हां, कोणाला अनुभव येईल हे सांगता येत नाही. तीन, चार दिवसांच्या संततधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला या आश्चर्याचा अनुभव घेता आला. नंदुरबार जिल्ह्यात तीन ते चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले वाहू लागले. तलावांसह लघु, मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले. विहिरींनाही पाणी उतरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली. काही ठिकाणी तर, पावसाने आता आवरावे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

संततधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावात गुरुवारी चमत्कार घडला. २० वर्षांपासून बंद पडलेल्या एका शेतातील कूपनलिकेतून चक्क ६० फुटापर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. मधुकर सावंत या शेतकऱ्याच्या बंद कूपनलिकेच्या बाबतीत हा चमत्कार घडला. प्रारंभी या कूपनलिकेतून मोठा आवाज आला. त्यानंतर अचानक पाण्याचा मोठा फवारा आकाशात फेकला गेला.

Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
mother threw the little baby in the swimming pool
“अगं आई ना तू?”, पोटच्या लेकराला स्विमिंग पूलमध्ये फेकलं; VIDEO पाहताना चुकेल काळजाचा ठोका
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम

हेही वाचा : पेसा कायद्यांतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत नोकरीचे आदेश – आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित

सुमारे अर्धा तास ६० फुटापर्यंत आकाशात पाण्याचा फवारा उडत होता. यानंतर पाण्याचा दाब कमी झाला. परंतु, कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणावर पाणी येणे सुरुच राहिल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजाने कूपनलिकेवर दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद केला.

कूपनलिकेतून निघणारे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कूपनलिकेतून येणारे पाणी बंद केले. परंतु, तब्बल २० वर्षांपासून बंद असलेल्या कूपनलिकेतून अचानक आलेल्या या पाण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जमिनीच्या पोटातील हे एक आश्चर्य असल्याचे मानले जात आहे.

Story img Loader