नंदुरबार : धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. धनगरांना आदिवासींप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देवू, मात्र आदिवासी आरक्षणात त्यांना हिस्सा न देण्याची शासनाची भूमिका आहे, असे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे पाच ऑक्टोबर रोजी आदिवासी संघटनांकडून रेल रोकोची हाक देण्यात आली आहे. धनगरांना आदिवासी समाजात आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा नंदुरबारमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नंदुरबार येथे आदिवासी संघटनांची बैठक झाली. बैठकीत धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला. त्यासंदर्भात पाच ऑक्टोबरला आदिवासी समाजाकडून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही. परंतु, धनगरांना आदिवासींमधून कोणतीही योजना देण्यास विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करणात आले.

Nagpur sikandarabaad Vande Bharat Express coaches to be reduced
टीसचा अहवाल जाहीर करा, आदिवासी संघटनांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
halal certification
हलाल म्हणजे काय? ‘या’ राज्यात हलाल प्रमाणपत्रावर बंदी का घालण्यात आली?
Nagpur Improvement Trust does not have funds for the road promised by Gadkari
गडकरींच्या वचननाम्यातील रस्त्यासाठी नासुप्रकडे निधी नाही?
aditi tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार? आदिती तटकरे म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये…”
denial of 30 percent reservation for women along with scheduled castes tribes and OBCs is matter of concern says Sudhir Mungantiwar
आरक्षण नाकारणे हे देशासाठी चिंताजनक – मुनगंटीवार
bangladeshis issue in chhatrapati sambhajinagar municipal corporation
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
only one Gondi school in Maharashtra struggles for survival
महाराष्ट्रातील एकमेव गोंडी शाळेचा अस्तित्वासाठी संघर्ष, शिक्षण विभागाविरोधात ग्रामसभेची…

हेही वाचा : नाशिक : विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करण्याची सूचना; पोलीस-गणेशोत्सव मंडळ बैठक

सर्व राजकारण्यांनी राजकारण बाजूला सारून आंदोलनात एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ज्यांना आदिवासी संघटनांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली विरोध करायचा नसेल त्यांनी वेगळे आंदोलन करावे, मात्र धनगरांना आदिवासी समाजामध्ये कदापि सामावून घेऊ नये, अशी भूमिका यावेळी समाज बांधवांनी मांडली. आदिवासी संघटनांच्या बैठकीत आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पदमाकर वळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, सिताराम पावरा, मालती वळवी, वहारू सोनवणे, डॉ. भरत वळवी आदी उपस्थित होते.

Story img Loader