नाशिक : गिधाड संवर्धन केंद्राचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अंजनेरी येथील प्रकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. अंजनेरी येथील प्रस्तावित रज्जूमार्गास (रोपवे) पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. अंजनेरी परिसरातील जैवविविधता तसेच गिधाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी उभारलेल्या लढ्यास यश आल्यामुळे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी समाधान व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील वर्षी नाशिकच्या दौऱ्यावर आले असता गिधाड संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली होती. नाशिकचे तत्कालीन पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वेळा अंजनेरी येथील पर्वताचा तसेच जैवविविधता, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास केला असता सुमारे ९०० गिधाडांची कड्याकपारीत घरटी आढळून आली. या ठिकाणी गिधाडांच्या किती प्रजाती आहेत, याचा शोध घेऊन त्यांचा बचाव आणि संवर्धन कशा प्रकारे करता येईल, यासाठी केंद्र सरकारकडे त्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. नाशिक वनविभागाकडून हरियाणातील पिजोरच्या धर्तीवर अंजनेरी येथे गिधाड संवर्धन केंद्र उभारण्यास मान्यता मिळाली असून त्याचे कामही सध्या सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा