नाशिक : शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या चुंचाळे शिवारात पहाटे भंगारच्या गोदामांना भीषण आग लागली. यात लाखो रूपयांचे साहित्य भस्मसात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चुंचाळे शिवारातील अनधिकृत भंगार बाजार मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यावर एकदा कारवाई झाली होती. पण कालांतराने काही भंगार दुकाने व गोदामे पुन्हा कार्यान्वित झाली. याच परिसरातील दत्तनगर भागात ही घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास एका गोदामाला आग लागली. काही वेळात ती आसपासच्या गोदामात पसरल्याचे सांगितले जाते.

gangster Tamil Nadu arrested, gangster Tamil Nadu in Mumbai,
तामिळनाडूमधील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक; हत्या, हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Two policemen arrested for kidnapping and demanding ransom nagpur
पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक
Traffic congestion in Radhanagar Khadakpada Kalyan West disturbs residents and students daily
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Shop fire Nashik, hospital safe Nashik, fire Nashik,
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
senior officials of railways to provide more than 60 rakes twice for onion transport
नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक, व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी
our sentenced to life imprisonment for robbeing Pune District Central Bank branch
पुणे : जिल्हा मध्यवर्ती बंँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना जन्मठेप
Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास

हेही वाचा : नाशिक : नानेगावजवळ बिबट्या जेरबंद

या गोदामालगत आनंदवाटीका गृहप्रकल्प आहे. अकस्मात भडकलेल्या आगीने परिसरात एकच धावपळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्वच अग्निशमन केंद्रावरील आठ ते नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. अंबड व सातपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : नाशिक : ओबीसी हक्कांसाठी आता समता परिषद मैदानात, उत्तर महाराष्ट्रात मेळावे घेण्याची घोषणा

आगीत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. पण वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.