नाशिक : मराठवाड्यातील बिअरचे कारखाने बंद करा, मगच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता पाण्याचा अपव्यय होऊ नये, पाण्याचे सूक्ष्म नियोजन व्हावे, यासाठी मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी म्हटले आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा मुबलक नसल्याने नांदगाव, येवला, सिन्नर हे तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत. नाशिकमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा नाशिककरांसाठी कमी पडत असल्याने काश्यपी, गौतमी या धरणांतील पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने एक-दोन महिन्यात टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत नाशिकमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यातच गंगापूर धरणातील पाणी सोडल्यास उन्हाळ्यात नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

cop woman complaint against husband in nashik over uniform
नाशिक : पोलीस पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर – संशयिताविरुध्द गुन्हा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
March in Dhule for Devendra Fadnavis to implement his promises
देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी धुळ्यात मोर्चा
ias officer puja khedkar files harassment complaint
Puja Khedkar : ‘मला अपात्र ठरविण्याचा UPSC ला अधिकार नाही’, फसवणूक प्रकरणावर पूजा खेडकर काय म्हणाल्या?
High Court, Maha vikas Aghadi, Maharashtra bandh, Badlapur incident, bandh, unconstitutional, 2004 judgment, latest news, loskatta news,
महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद करण्यास मज्जाव, बंद बेकायदा असताना तो पुकारलाच कसा ? उत्तर दाखल करण्याचे आदेश
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
Ambadas Danve, badlapur school case,
उद्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन छेडणार, अंबादास दानवे यांचे वक्तव्य
Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा

हेही वाचा : महाआवास अभियानात विशेष राज्यस्तरीय पुरस्कारांत जळगावचा ठसा, विविध गटांत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थानी

जिल्ह्यातील अनेक गावात सद्यस्थितीत टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मराठवाड्यात जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन नसल्याने नाशिक, अहमदनगरमधील ८.६ टीएमसी पाण्याचा पुरेपूर फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा आणि डीएमआयसी करमाड, बिडकीन या औद्योगिक वसाहतींतील बिअर कारखान्यांना आणि मोठ्या कंपन्याना होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद करून जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी नमूद केले आहे.