नाशिक – राज्यातील ११ एकलव्य निवासी शाळांची संलग्नता प्रक्रिया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) पूर्ण करण्यात आल्याने इयत्ता ११ वीत प्रवेशाच्या जागा ५४० ने वाढणार आहेत. त्यापैकी नऊ शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून तर दोन शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटीतर्फे (नाशिक) राज्यात इंग्रजी माध्यमाच्या ३७ एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेतात. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते १२ वीपर्यंतचे वर्ग नैसर्गिक वर्गवाढीने सुरू करण्यास मान्यता मिळते. नुकतीच अक्कलकुवा, चणकापूर, पळसुंदे, सवणे, बोटोनी, चामोशी, गेवर्धा, ढोंगसांगळी, धडगाव तसेच शेंडेगाव आणि शिंदे दिगर या शाळांना सीबीएसई मंडळाचा इयत्ता ११ वी विज्ञान शाखेसाठी संलग्नता क्रमांक प्राप्त झाला. शेंडेगाव आणि शिंदे दिगर या दोन शाळांमध्ये आगामी तर उर्वरित शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश दिले जाणार आहेत.

CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Primary teachers across the state on leave for protest tomorrow
राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?
Chanakya Skill Development Center in which college in Nagpur district
नागपूर जिल्ह्यात या महाविद्यालयात चाणक्य कौशल्य विकास केंद्र
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
Due to the new decision of the school education department there is a possibility of educational loss for poor students in rural areas
शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

हेही वाचा >>>नाशिकमधील जागावाटप तिढ्यावर शरद पवार यांचा तोडगा मान्य होणार का ?

दरम्यान, संलग्नता क्रमांक प्राप्त झाल्याने नऊ एकलव्य शाळांमध्ये प्रत्येकी ६० याप्रमाणे ५४० जागा ११ वी प्रवेशासाठी नव्याने उपलब्ध होणार आहेत. सीबीएसई मंडळाच्या निर्देशानुसार १६ऑक्टोबरपर्यंत पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

सीबीएसई मंडळाच्या अटींची पूर्तता

प्राचार्य आणि शिक्षक यांनी तांत्रिक अडचणींवर मात करून संलग्नता मिळविल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना सीबीएसईचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेण्यास मदत हाेणार आहे. सीबीएसई मंडळाच्या सर्व अटींची पूर्तता करून ११ शाळांना इयत्ता ११ वीसाठी सुधारित संलग्नता क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा इयत्ता १० वीनंतरच्या शिक्षणाचा प्रश्न निकाली निघाला आहे.- विनिता सोनवणे (उपायुक्त, आदिवासी विकास विभाग)