येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित, वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. औषधे बाहेरून घ्यावी लागणे, दुपारी चारनंतर आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी गायब होत असल्याने कुलूपबंद दरवाजा पाहत रुग्णांनी दुसऱ्या रुग्णालयात जाणे, या ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी केंद्राला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला.

हेही वाचा- नाशिक : इगतपुरी तालुक्यात २४ तासांत तीन अपघात; तिघांचा मृत्यू तर, १४ जण जखमी

navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Monkeypox, monkeypox virus india,
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे
Online facility available for transfer in slum redevelopment Mumbai
झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध
Vacancy of Doctor Posts in Health Department Mumbai print news
आरोग्य विभागाची खरेदी उदंड मात्र डॉक्टरांची पदे रिक्त!
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास मित्तल यांनी बुधवारी अचानक भेट दिली. केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत कसून चौकशी केली. अनेक कर्मचारी आणि डॉक्टरांची अनुपस्थिती असल्याने त्यांनी हजेरीपट तपासला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत प्रश्नावली केली. रुग्णांशी संपर्क साधून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत विचारणा केली. आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळते. शस्त्रक्रिया, प्रसुती कक्ष असतानाही त्यात सुविधा नाहीत. केंद्रात पाण्याची व्यवस्था नाही, एक वर्षापासून केंद्रात एकही प्रसुती झालेली नसल्याचे ऐकून मित्तल संतप्त झाल्या. केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून एक राठोड नावाचे अधिकारी रजेवर असल्याने डॉ. कुंटे यांच्यावर संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी आहे. हे दोन्ही अधिकारी रात्री केंद्रात राहत नाहीत. दुपारी चारनंतर एकही कर्मचारी केंद्रात राहत नसल्याने रात्रीच्या वेळेला परिचारिकाही नाही, अशा अनेक समस्यांचा पाढा रुग्णांनी वाचला.

हेही वाचा- जिल्हा बँकेची कर्जवसुली अमानुष पध्दतीची; भाजप किसान मोर्चाची तक्रार

आपण वैद्यकीय सेवा देण्यास असमर्थ आहात काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दौऱ्यादरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हेही उपस्थित होते. आठ दिवसात कारभारात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा मित्तल यांनी दिला.