आदिवासी विकास प्रकल्प विभागातंर्गत सहा तालुक्यातील दोन हजार विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून अजूनही वंचित असल्याचे उघड झाल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या विभागातील संबंधितांना चांगलेच फटकारले. लोकाभिमुख कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे विविध कामांसंदर्भात डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांत विशाल नरवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, आदिवासी उपायुक्त संदिप गोलाईत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर आदी उपस्थित होते.
कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत सुरगाणा, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव या सहा तालुक्यातील १९ हजारपैकी १७ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. परंतु, यापैकी दोन हजार विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्याचे आढावा बैठकीत उघड झाले. यावरून डॉ. पवार यांनी संबंधितांची झाडाझडती घेत यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. निधी उपलब्ध असूनही दोन हजार मुलांना शिष्यवृत्ती का मिळाली नाही, त्याचे उत्तर अहवाल सादर करून देण्यास त्यांनी सांगितले. शिष्यवृतीचे सहा लाख रुपये आणि त्यावर मिळणारे व्याज तसेच पडून असल्याने वंचित मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रांत, जिल्हाधिकारी यांनी देखील लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी केली. सामुदायिक विवाह सोहळ्यातील बहुतांश जोडप्यांना अजूनही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. घरकुलाच्या खऱ्या लाभार्थींनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
Due to the new decision of the school education department there is a possibility of educational loss for poor students in rural areas
शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता
sarva karyeshu sarvada 2024 Information about ngo bhatke vimukt vikas pratishthan
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
tribal development department
आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार, आदिवासी विकास विभागाचा निर्णय
Plot to Mumbai Bank despite violation of MHADA Act Mumbai news
म्हाडा कायद्याचे उल्लंघन करून ‘मुंबै बँके’ला भूखंड! प्रतीक्षानगर येथील जागेचे थेट वितरण
Education Opportunity Various courses run by Amrit
शिक्षणाची संधी: ‘अमृत’द्वारे चालवणारे विविध कोर्सेस

हेही वाचा >>>नंदुरबार: मार्चनंतरही कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित; अनेक शासकीय कार्यालयांचे आर्थिक व्यवहार ठप्प

आढावा बैठक सुरू होताच डॉ. पवार यांनी आरोग्य विभागाचा विषय चर्चेला घेतला. गरोदर मातांच्या प्रसुतीची कामे आतापर्यंत किती डॉक्टरांनी केली आहेत, किती डॉक्टरांनी केली नाहीत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी केव्हा येतात, असे प्रश्न उपस्थित करीत काही अडचणी असल्यास सविस्तर माहिती देण्यास डॉ.पवार यांनी सांगितले. आंबाठा, उंबरठाण, आंबूपाडा, कुकूडणे आदी उपकेंद्रातील अडचणी नागरिकांनी मांडल्या. आयुषमान भारत योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागात मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. गरोदर मातांना वणी येथे सोनोग्राफीसाठी जावे लागते. परंतु, कंत्राट संपल्याने सोनोग्राफी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचीही दखल डॉ.पवार यांनी घेतली. तालुक्यात केवळ सुरगाणा, उंबरठाण, पळसन या तीन ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा आहे. बाऱ्हे, उंबरठाण या ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आल्याने डॉ.पवार यांनी दखल घेतली.

तालुक्यातील ६६ वाड्या-पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. या आढावा बैठकीत नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेऊन कामे करावीत, अशी सूचना पवार यांनी केली.