लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : या वर्षापासून देशातील पहिला आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव मुंबई किंवा पुणे येथे आयोजित केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली.

Maharashtra Kesari to undergo doping test Decision in the Wastad Pailwan Round Table Conference
महाराष्ट्र केसरीसाठी डोपींग चाचणी होणार, नुरा कुस्तीला रामराम; वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेत निर्णय
Crime against Bogus National Advisor in Prime Ministers Office Kashmira Pawar and her husband
पंतप्रधान कार्यालयातील बोगस राष्ट्रीय सल्लागार साताऱ्यातील काश्मीरा पवारसह पतीवर गुन्हा
selection of Lalit Gandhi as President of Maharashtra Chamber of Commerce and Industries
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजवर कोल्हापूरचा झेंडा; ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
chhagan bhujbal
“विधानसभेला जेवढ्या जागा शिंदे गटाला द्याल…”; जागावाटपाबाबत छगन भुजबळांची नवी मागणी!
7 members elected unopposed from kolhapur in Maharashtra Chamber of Commerce,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळात कोल्हापुरातून ७ जण बिनविरोध
ashok navare donated blood for 234 times in 48 year
सोलापुरात अशोक नावरे यांचे अखेरचे २३४ वे रक्तदान 
Devendra Fadnavis on FDI in Maharashtra
गुजरात, कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुतंवणूक, फडणवीसांचा विरोधकांना टोला
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे गुरुवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव महाराष्ट्रात झाला पाहिजे, अशी मागणी चर्चेत केली होती. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने त्याचे आयोजन व्हायला हवे, ही त्यांची अपेक्षा मान्य करण्यात आली.

आणखी वाचा-वाढत्या मागणीमुळे जंगलातील सफेद मुसळीच्या प्रमाणात घट

आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव पाच की सात दिवसीय तसेच अन्य बाबी निश्चित करण्यासाठी लवकरच समिती जाहीर केली जाईल. या माध्यमातून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवास सुरुवात होईल, असे सामंत यांनी सांगितले. लोककला जपण्यासाठी १५ ते २५ वयोगटातील युवक तुतारी वाजविण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे निश्चितपणे कौतुक आहे. तथापि, लोककला जपत असताना त्यांनी केवळ तुतारी वाजवावी, प्रचार करू नये असा सल्ला सामंत यांनी दिला.

डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेनंतर धोकादायक कारखान्यांची अ, ब आणि क गटात वर्गवारी करण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शुक्रवारी सादर होणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या हिताचा, महिलांच्या संरक्षणाचा, युवकांच्या उद्धाराचा व शेतकऱ्यांना ताकद देणारा असेल याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.