जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेल्या खासगी बसला ओडिसाच्या सीमेवरील सोहला गावाजवळ रविवारी पहाटे एक वाजता अपघात झाला. अपघातातील जळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत.

जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ४९ भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ३१ प्रवासी आहेत. जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप असून मंगलाबाई पाटील (बळीराम पेठ, जळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbai nashik traffic jam
मुंबई – नाशिक महामार्गावर अपघात, वाहने बंद पडल्यामुळे कोंडी; खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा
Accident involving private bus and container at Alephata on Pune Nashik National Highway pune news
खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक: सात जण गंभीर जखमी; पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा येथील घटना
Arrest for vandalizing vehicles in Kasba Peth pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणारे गजाआड; दोन अल्पवयीन ताब्यात
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?

हेही वाचा – नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

हेही वाचा – “बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबलपूर जिल्हाधिकारी आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व अपघातग्रस्तांना मदतीविषयी सूचित केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्तांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल केले. यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (रा. जळगाव) या जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संबलपूर येथे रवाना झाल्या असून, सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियंत्रण कक्ष ०२५७-२२१७१९३ /२२२३१८० अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (९३७३७८९०६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader