लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी परिसरात फिरणाऱ्या केरळमधील काही अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता आक्षेपार्ह काहीही आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

thane forest plots marathi news
ठाणे: ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्टयांचे वाटप, श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
Sanjuba Secondary School
वाहनकोंडीमुळे ‘ संजुबा’च्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

रविवारी केरळहून १० अल्पसंख्यांक विद्यार्थी त्र्यंबकेश्वर येथील भातखळा धर्मशाळेत दाखल झाले. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी काही अल्पसंख्यांक समाजाचे तरुण संशयितरित्या फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तरुणांची चौकशी करण्यात आली. या भागात गिरीभ्रमणासाठी आल्याचे तरुणांकडून पोलिसांना सांगण्यात आले.

आणखी वाचा-आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी, केरळमधील १० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ब्रह्मगिरीसह अन्य ठिकाणी छायाचित्रे काढल्याचे सांगितले. स्थानिकांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्र्यंबक पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या ओळखपत्रावरून माहिती घेण्यात आली. चौकशीत काहीही संशयास्पद न आढळल्याने त्यांना सोडून दिल्याचे देसले यांनी सांगितले.