जळगाव : निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम यंत्रावरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे. 

हेही वाचा >>> Maharashtra Lok Sabha Election Result 2024 राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव, रावेरमध्ये मतदारसंघांत कोणाचे वर्चस्व राहणार? निकालातून दुपारी चारपर्यंत स्पष्ट

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणाले यांनी, मतदान यंत्रे एवढ्या दिवसांपासून ठेवूनही त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे, अशी शंका उपस्थित करीत रावेर लोकसभा मतमोजणीवर आक्षेप घेतला. ज्या मतदान यंत्राची बॅटरी ९९ टक्के आहे, त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असून, दिवसभर यंत्रात मतदान झाले. एवढे असूनही मतदान यंत्रातील फक्त एक टक्का चार्ज कसे कमी होऊ शकते? असे प्रश्नही पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांकडून उपस्थित केले. त्यानंतर काही वेळ मतमोजणी थांबवण्यात आली. दरम्यान, आता पुन्हा मतमोजणी सुरू झाली असून, सहाव्या फेरीअखेर रक्षा खडसे यांना जवळपास ७५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. मतदारसंघात तिसर्‍या फेरीची मतमोजणी सुरू असून, भाजपच्या रक्षा खडसे यांचे मताधिक्क्य वाढत आहे. अजून २३ फेर्‍यांपर्यंत पोहोचायचे आहे. कदाचित हे मताधिक्क्याची आघाडी अडीच लाखांपर्यंत जाऊ शकेल आणि हे चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. विरोधकांचे संतुलन बिघडलेले दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका त्यानुसार यांनी गोंधळ घालायचं केलेलं ठरवत दिसतंय असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader