नाशिक: अमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ठाकरे गटातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग रोखण्यासाठी एमआयएम या पक्षाने केलेल्या मागणीची सत्ताधारी महायुती सरकारने युध्दपातळीवर पूर्तता केल्याचे उघड झाले. मोर्चाच्या आदल्या दिवशी एमआयएमने निवेदनाद्वारे मागणी केली आणि अवघ्या काही तासात शिक्षण विभागाने समस्त शाळा व महाविद्यालयांना मोर्चात विद्यार्थी सहभागी झाल्यास प्राचार्य, मुख्याध्यापकांविरोधात कारवाईचा इशारा दिला.

हेही वाचा >>> अमली पदार्थांच्या विरोधात ठाकरे गटाचा भव्य मोर्चा – शहरातील आमदारांना हप्ते मिळत असल्याचा संजय राऊत यांचा आरोप

Extension of 15 days for students to submit SEBC and Non Criminal Certificate
एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Female trainee doctor molested by professor in nair hospital
डॉक्टरकडून वैद्याकीय विद्यार्थिनीचा विनयभंग; नायर रुग्णालयातील घटना, तिघांवर कारवाई करण्याची शिफारस
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
thane, Saraswati Mandir Trust School, Naupada, teacher suspension, student assault, legal action, Thane Municipal Education Officer, student safety, thane new
सरस्वती शाळेतील शिक्षिकेला निलंबित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन सजग
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी

विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करण्याची सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील ही कार्यपध्दती अमली पदार्थ तस्करीला प्रोत्साहन देणारी असल्याची टीका ठाकरे गटाने केली. मुंबई पोलिसांनी येथील अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका गोदामातून मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला. अमली पदार्थ माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी संबंधावरून शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा राजकीय वातावरणात शुक्रवारी ठाकरे गटाच्यावतीने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाच्या आदल्या दिवशी एमआयएच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून ठाकरे गटाकडून राजकारण केले जात असल्याकडे यंत्रणेचे लक्ष वेधले होते. ही मागणी प्रशासकीय पातळीवरून अतिशय तत्परतेने मान्य करण्यात आली. युवापिढीला अमली पदार्थापासून वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तो राजकीय नव्हे तर सामाजिक कारणासाठी होता. सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यात प्रतिसाद देऊन सहभागी होण्याचे मान्य केले होते. ही बाब लक्षात आल्यावर प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावातून आदेश काढून विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखला. म्हणजे एकप्रकारे शिक्षण विभाग अमली पदार्थ तस्करीला प्रोत्साहन देते, त्यांना यापोटी हप्ते मिळतात, असा प्रश्न करीत राऊत यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.