मनमाड : शहराला यापुढे १६ ते १७ दिवसांआड पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागात अडीच तास पाणी वितरीत करावे, असे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील पाणी वितरणाबाबत मुख्याधिकारी चौधरी यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली होती. शहरात सध्या २४ दिवसाआड पाणी वितरण होते.

पाणी वितरणाच्या दिवसांमध्ये वाढ कशी झाली, याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठीची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. मनमाड शहरात यापुढे १७ व्या दिवशीच अथवा त्यापूर्वी पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागाला अडीच तास पाणी वितरण करावे, पाण्याची बचत करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची घ्यावी, असे निर्देश प्रशासक चौधरी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. या कामात जे कर्मचारी हलगर्जीपणा करतील, त्यांच्याविरूध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली.

Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
10 crore devotees bathed in maha kumbh mela
Maha Kumbh Mela 2025: १० कोटी भाविकांचे महाकुंभ‘स्नान’
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

हेही वाचा…राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास

नागरिकांनीही पाणी पिण्यासाठीच वापरावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तीव्रता अधिक जाणवत आहे. नागरिकांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांना नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, ज्या भागात पाणी वितरण आहे, त्या भागातील नागरिकांनी त्या वेळेतच पाणी भरून घ्यावे. एखाद्या भागातील पाणी वितरण संपल्यानंतर दुसऱ्यांदा पाणी सोडण्यासाठी आग्रह करू नये, दुसऱ्यांदा पाणी वितरण होणार नाही, सध्या सकाळी पाच ते रात्री १२ पर्यंत वेळ करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पाणी पुरवठ्याद्वारे नागरिकांनी पाणी भरून घेण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.

हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार

सध्या मनमाड शहराला तांत्रिक अडचणींमुळे २२ ते २३ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. मात्र नव्या वितरण व्यवस्थेत रात्री पाणी पुरवठा करीत पुढील आठवड्यापासून १७ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. – शेषराव चौधरी ( मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद)

Story img Loader