लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : पालखेड धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन मनमाड शहराला कधी मिळते, याकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे. दोन-तीन दिवसांत ते अपेक्षित आहे. त्यामुळे शहराची पाणी टंचाई काही प्रमाणात तरी कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
lottery for 2264 houses of mhadas Konkan Mandal which postponed three times has finally release on 5th February
अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला मुहूर्त मिळाला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ फेब्रुवारीला सोडत
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 

दिवाळीनंतर हवामान बदलल्याने मनमाड शहराची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. अनेक भागांमध्ये २० ते २२ दिवसांआड अनियमित व अपुरा पाणीपुरवठा नगरपालिकेच्या नळांद्वारे सुरू आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात सध्याच्या वितरण व्यवस्थेत जेमतेम डिसेंबरअखेर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

आणखी वाचा-नाशिक : वाहतुकीत अडथळ्यामुळे दुकानदार, फळ विक्रेत्यांविरुध्द गुन्हा

अशा गंभीर परिस्थितीत या आठवड्यात सुटणारे पालखेडचे आवर्तन हा एकमेव दिलासा ठरणार आहे. त्यावरच शहरातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. सध्याचे हे पालखेडचे आवर्तन निफाड, येवला भागातील पिकांसाठी तर मनमाड-येवला आणि रेल्वेच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणार आहे. मात्र असे असले तरी आणखी काही महिने करंजवण योजना पूर्ण होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी वागदर्डी धरण न भरल्याने शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम आहे. त्यातच रब्बीचे पालखेडचे आवर्तन लांबत चालले आहे. त्यामुळे मनमाडकरांचीही चिंता वाढत चालली आहे.

आणखी वाचा-हुद्यांच्या नावात बदल केल्यास अडसर

करंजवणचे काम ६५ टक्के पूर्ण

मनमाडसाठी सध्या करंजवण-मनमाड जलवाहिनी योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यातील जलवाहिनी, जलशुध्दीकरण प्रकल्प उभारणी आदी कामे जवळपास ६५ ते ७० टक्के पूर्ण होत आली आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध झालेला आहे. ही योजना कधी पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात सध्या मृत साठ्यातील पाणी शिल्लक असून ते डिसेंबरअखेरपर्यंत पुरू शकते. दोन, तीन दिवसात सुटणार्या पालखेडच्या आवर्तनाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. -शेषराव चौधरी ( मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका)

Story img Loader