जळगाव : देशातील मणिपूर राज्य गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचारापासून धगधगत आहे. दोन महिलांना विवस्त्र करून धिंडही काढण्यात आली. या घटनेचा शहरातील महिला संघटनांतर्फे मंगळवारी मूकमोर्चा काढत निषेध करण्यात आला. दोषींना फाशी द्या, अशी मागणी करीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील जी. एस. मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महापौर जयश्री महाजन, सरिता माळी-कोल्हे, मंगला पाटील, मंगला बारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोर्चा क्रीडा संकुल चौकमार्गे नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी मोर्चाला प्रवेशद्वारावर रोखले.

BJP minister accused in multi state credit union scam Petition of the Deputy Commissioner of Police
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्यात भाजप मंत्र्यावर आरोप; पोलीस उपायुक्ताच्या याचिकेनंतर खळबळ पोलीस महासंचालकांकडेही बोट
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…
Deputy Commissioner of Police 17 year old son commits suicide
छत्रपती संभाजीनगर: पोलीस उपायुक्तांच्या १७ वर्षीय मुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Shahi Dussehra Satara, Bhawani Talwar,
साताऱ्यात शाही दसरा सोहळा उत्साहात; भवानी तलवारीस पोलीस मानवंदना
Approval of the tender of Rs 47 lakh 27 thousand for the statue of Sambhaji Maharaj
डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय!
Rahul Gandh
Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?

हेही वाचा >>> मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हा बंद, आदिवासी संघटनांची हाक

प्रत्येक नारीची एकच पुकार न्याय मिळावा हा आमचा अधिकार, न्याय हवा- नको कारवाई भिक्षा- अत्याचाराला मरेपर्यंत फाशी हीच असेल एकमेव शिक्षा, महिलांना नसेल सन्मान तर देश तरी कसा बनेल महान, करू नका महिलांचे शोषण- नाहीतर देशाचे होईल कुपोषण, स्त्री हे देशाचे भाग्य- तिच्यावर होतो अन्याय हे तिचे नव्हे तर देशाचे दुर्भाग्य असे फलक हातात घेत महिला पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. महिला आता सुरक्षित नाहीत. आमचा आवाज दाबला जातोय. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू आहे. मात्र, देशभरात काय सुरू आहे, हे सत्ताधारी विसरले आहेत. केंद्र सरकारला काही गांभीर्य आहे का? राजकीय नेत्यांना  खुर्ची सोडावीशी वाटत नाही. खुर्चीसाठी राजकीय रस्सीखेच सुरू आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेचे काय? कोणत्याही गोष्टीचा सरकारकडून विचारच होत नाही, असा संताप महिला पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिक : विशेष फेरीसाठी ४, ४८७ अर्ज; अकरावी प्रवेश प्रक्रिया

 देशविघातक प्रवृत्ती भारतीय लोकशाहीला लागलेली कीड आहे. या शक्ती जाणीवपूर्वक देशात विखारी वातावरण निर्माण करीत आहेत. समाजासमाजांत तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकाविणे व त्यातून आपले हेतू साध्य करून घेणे, हाच त्या शक्तींचा मुख्य प्रयत्न आहे. त्या दुर्दैवी महिलांत तर एक देशासाठी कारगिल युद्धात लढलेल्या वीर जवानाची पत्नी आहे. असे दुर्दैवी भाग्य त्यांच्या कपाळी लिहिणार्‍या या विघातक शक्तींना आवर घालण्यासाठी त्या घटनेस जबाबदार असलेल्या समाजकंटकांना त्वरित कठोर शिक्षा व्हावी. त्यांच्यावरील खटला हा जलद गती न्यायालयात चालवावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी प्रसाद यांना देण्यात आले.