नाशिक – नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने बुधवारी दुपारी ६५ टक्क्यांची पातळी गाठली. त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुध्द नगर, नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळाला आहे.

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागातील धरणांमधून विहित सूत्रानुसार पाणी सोडावे लागते. मागील दुष्काळी वर्षात तशी वेळ ओढावली होती. तेव्हा जायकवाडीत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा, पालखेड समुहातील २२ धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागले होते. यंदा प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने नाशिक, नगरमधील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता. ऑगस्टमध्ये खऱ्या अर्थाने तो उंचावण्यास सुरूवात झाली. पण, दोन्ही जिल्ह्यांत जायकवाडीतील अल्प जलसाठ्याची चिंता होती. या काळातील मुसळधार पावसाने नाशिक, नगरमधील सर्व प्रमुख धरणे तुडुंब भरली. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. याचा लाभ जायकवाडीतील जलसाठा उंचावण्यास झाला. बुधवारी दुपारी जायकवाडी धरणात ५०.३० टीएमसी म्हणजे ६५.६१ टक्के जलसाठा झाला. जायकवाडीने ही पातळी गाठल्याने समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार नाशिक, नगरमधून आता पाणी सोडावे लागणार नाही.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
Guillain Barré syndrome GBS patients pune health department
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच! आरोग्य विभागाकडून पाणी, चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …

हेही वाचा >>>आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी; युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन

पाणी सोडण्याची गरज नाही

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत ३४ हजार सहा दशलक्ष घनफूट (३४ टीएमसी) आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट (२१.६ टीएमसी) पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झाला आहे. यामुळे जायकवाडी ६५ टक्क्यांहून अधिक भरले. सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाने जायकवाडीचा जिवंत जलसाठा अपेक्षेआधीच ६५ टक्के झाला. समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न या वर्षीसाठी निकाली निघाला असून या तत्वानुसार वरील भागातून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही, असे जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी सांगितले.

Story img Loader