लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार: मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ २६ जुलै रोजी जिल्हा बंद करण्याची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राजकीय गटतट विसरुन जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना याप्रश्नी एक झाल्या असून राज्यात मणिपूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक देणारा नंदुरबार हा पहिलाच जिल्हा असणार आहे.

violence against women, Three-faced Ravan burnt,
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
police officer beats son, police officer family dispute,
कौटुंबिक वादातून पोलीस अधिकाऱ्याची मुलास मारहाण, गुन्हा दाखल
On the occasion of Dussehra more than three and a half thousand vehicles have been registered in the transport department vasai news
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल
Inauguration of seven police stations under the jurisdiction of Pune City Police Commissionerate Pune news
सात नव्या पोलीस ठाण्याचे आज उदघाटन; ८१६ पदे, ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

आणखी वाचा-रेल्वेचे वेळापत्रक अजूनही विस्कळीत

मणिपूरमधील महिला अत्याचाराचा सर्वच स्तरावरुन निषेध नोंदविला जात असताना आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नंदुरबारमध्ये यासंदर्भात दोन दिवसांपासून विविध सामाजिक संघटनांकडून बैठकांचे सत्र सुरु होते. या बैठकांमधून एकमताने जिल्हा बंद करण्याविषयी ठरविण्यात आले. मणिपूर, मध्यप्रदेश, राजस्थानमधील घटनांसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खासगी वसतिगृहातील आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर नाचण्यास सांगणे, ही सर्वच कृत्ये अमानवीय आहेत. याच विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सोमवारी समस्त आदिवासी समुदायाच्या वतीने जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना बंदविषयी निवेदन देण्यात आले. व्यापाऱ्यांनाही संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.