नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १३ तारखेला मतदान होत असून मतदानाला ४८ तासांचा अवधी शिल्लक असतानाही अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मतदान केंद्रांसाठी पोलीस पथक शनिवारीच रवाना झाले.

नंदुरबार मतदारसंघ हा डोंगराळ तसेच नर्मदा नदीकाठाने व्यापलेला आहे. अनेक ठिकाणी अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. डोंगराळ भाग असल्याने अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात बहुतांश भागात भ्रमणध्वनीशी संपर्क होऊ शकत नाही. अशा भागांमध्येही मतदान केंद्रे असून अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहचताना कसरत करावी लागते.

ganja seized in pune marathi news
पुणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, चालू वर्षात तब्बल ३६७६ कोटींचा गांजा जप्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
nagpur hit and run case police revealed sanket bawankule was in the car
संकेत बावनकुळे कारमध्ये असल्याचे उघड ; नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची माहिती
state government gave funds for construction of drainage boundary wall pune
पुणे : निधी फक्त भाजप आमदारांनाच, अजित दादांच्या आमदारांना ठेंगा; महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता
Ganesh Naik aggressive in meeting with commissioner regarding 14 villages excluded from NMMC
“चौदा गावांसाठी एक रुपयाही खर्च नको”, आयुक्तांसमवेतच्या बैठकीत गणेश नाईक आक्रमक
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

हेही वाचा…VIDEO : नंदुरबारची सभा संपताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले असे काही की, सुरक्षा यंत्रणेची तारांबळ

मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर पोहचणे अधिक दिव्य मानले जाते. या केंद्रांवर पोहचण्यासाठी पथकाला रस्त्याने कित्येक किलोमीटरचा प्रवास आणि नंतर सरदार सरोवराच्या जलाशयातून होडीसदृश्य बार्जमधून जावे लागते. त्यामुळे मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी लागणारे अंतर पाहता या पाच मतदान केंद्रांसाठी अधिकारी, कर्मचारी, पोलीस पथकांना सर्वांत आधी रवाना केले जाते. मतदानासाठी ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना शनिवारीच या पाच मतदान केंद्रांसाठी पथक रवाना झाले.

हेही वाचा…राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

या पाच मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी सुरुवातीला १५० किलोमीटरचा प्रवास पथकांना गुजरातमधून करावा लागला. हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर केवडिया कॉलनीत पथके आल्यावर कॉलनीतून होडीसदृश बार्जद्वारे मतदान साहित्य घेवून पथके सरदार सरोवराच्या जलाशयातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले. या पाच मतदान केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पहिले मतदार केंद्र असलेल्या मणिबेली केंद्राचा समावेश आहे. याशिवाय मुखडी, डनेल. बामणी आणि चिमलखेडी या मतदान केंद्रांवर देखील बार्जद्वारेच मतदान पथक पोहचणार आहे.